सुधागड किल्ला – Sudhagad Fort

सुधागड हा सह्याद्रीतील एक  खूप प्राचीन काळातील किल्ला असून सुमारे ३६५ वर्ष्या पूर्वी पासून हा किल्ला आहे.

हा किल्ला चढण्यासाठी सोपे आहे. हा किल्ला जिल्हा सुधागड मध्ये येतो. 

इतिहास

सुधागड या किल्याचे जुने नाव हे “भोरपगड” असे होते , तेंव्हा या वर भोर राज्याचे राज्य होते. नंतर काही काळाने  शिवाजी महाराज्यांनी जिंकला. तेंव्हा या किल्याला त्यांनी सुधागड असे नाव दिले. या किल्ल्याची उंची सुमारे ६२१ मीटर आहे. सुधागड हा खूप मोठा किल्ला असून, याला रायगडाची “प्रतिकृती” असे म्हणतात.

किल्यावर जाण्या साठी ठाणाळेहे एक गाव लागते, या गावामधून वर किल्यावर जाण्याचा मार्ग आहे. हे ‘ठाणाळे’ गाव २२०० वर्षे जुने आहे. यावरून असे दिसून येते की सुधागड किती प्राचीन किल्ला असावा. या किल्यावरील बांधकाम आणि भौगोलिक महत्त्व हे दर्शविते की काही महान शासकांनी किल्ला बांधला असावा असे दिसून येते. पुराणानुसार, असे सांगितले जाते ते  ‘भृगु’ ऋषींनी येथे वास्तव्य केले होते आणि त्यांनी या गडावर ‘भोराई’ देवीचे मंदिर स्थापन केले होते.

स्वराज्यात’ समावेश 

 इ. स. 1648 मध्ये सुधागडचा ‘स्वराज्यात’ समावेश करण्यात आला. जुन्या नोंदींमध्ये त्याचे वर्णन खालीलप्रमाणे दाखवीण्यात आले आहे.

25 सैनिकांनी हा किल्ला जिंकला होता.

“मालवजी नाईक कराके यांनी साखरदाराला शिडी लावली. सुरुवातीला जाधव आणि सरनाइक दोघेही सरदार ‘मालोजी भोसले’ यांच्या मार्गदर्शनाखाली गडावर चढले.  त्यानंतर हैबतराव गडावर चढले. 25 सैनिकांनी पुढे जाऊन रक्षकांना ठार मारले. पुढे किल्ल्याचा सरदार या लढाई मध्ये दु:खात मारला गेला आणि किल्ला जिंकला.”

काही काळानंतर शिवाजी महाराजांनी “भोरपगडाचे” “सुधागड” असे नामकरण केले. पुढे संभाजी अकबर (औरंगजेबाचा बंडखोर मुलगा) याच्याशी या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘पाच्छापूर गावात’ भेटला. अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्यांचा मुलगा आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद हे सर्व शिवाजी महाराजांच्या ‘अष्ट-प्रधान मंडळा’तील महत्त्वाचे व्यक्ती होते. संभाजीने या सर्वांना सुधागड जवळील परळी गावात मारले आहे. किल्ल्यांच्या संवर्धन कार्यामध्ये “बा रायगड परिवार” या संध्येचा खूप मोठा मोलाचा वाट आहे.

शिव जयंती

दर वर्षी किल्ले सुधागड येथे १९ फेब्रुवारी रोजी शिव जयंती (शिव जन्मोत्सव) मोठ्या उत्साहात साजरा होतो.

विशेष ठिकाणे

भूगोलाच्या क्षेत्रा नुसार या किल्ल्याचा परीघ बराच मोठा आहे. तेथील जवळ राहनारी लोक १ तासात ह्या किल्ल्यावर चढाई करतात तसेच इतर लोकांना हा किल्ला चढायला २ ते ३  तासाचा कालावधी लागतो. या किल्याची वाट खूपच दमछाक करणारी आहे.

 

या किल्ल्यावर २ तलाव आहेत आणि या तलावातील पाणी हे पिण्या योग्य आहे. या गडावर दर वर्षी नवरात्रीच्या दिवशी ९ दिवस राहण्याची आणि ३ वेळा जेवणाची व्यवस्था केली जाते. आणि हे सर्व तेथील ब्राम्हण जे देवीची पूज्य करतात ते हे सर्व व्यवस्था करतात. गडावर पंत सचिवांचा वाडा आहे, जिथे ५० लोक आरामात राहू शकतात. तसेच भोराई देवीचे मंदिर आहे, जिथे 25-30 लोक राहु शकतात. तेथील आजूबाजूच्या जंगलात विविध प्रकारची औषधी वनस्पती आणि झाडे पाहायला मिळतात. भोरेश्वर मंदिर, दिंडी दरवाजा(महादरवाजा), खिंड, विहीर, सुधागडचा टकमक टोक, राजवाडा.

 

सध्या खूप लोक या ठिकाणी श्रद्धेपोटी देवीच्या दर्शनासाठी, तर काही फिरण्यासाठी आणि ट्रॅकिंग साठी तसेच फोटोग्राफीसाठी येत असतात. तसेच या किल्यावर आपल्याला प्राचीन अवशेष सुद्धा पाहायला मिळतात. या किल्याचे संवर्धन सद्य “बा रायगड परिवार” ही संस्था करत असून मंदिरासाठी तेथील ब्राम्हण समाज कार्यरथ असतो. दर वर्षी ऑक्टोबर महिन्यात नवरात्री च्या दिवसांत खूप लोक या ठिकाणी भेट देण्यासाठी येथ असतात. काहींना देवीची ओटी भरायची असते. या देवीवर खूप साऱ्या लोकांची श्रद्धा आहे. या किल्ल्यावर खूप काही बघण्यासारखं आहे. नवरात्री च्या नवं दिवस झाल्यावे म्हणजे शेवट च्या दिवशी देवी साठी पंच पक्वानांचं नेवेद्य दाखवला जातो. येथील वातावरण हे खूप मनाला मोहून नेणारे आहे. तुम्ही एकदा भेट दिलीत तर दर वर्षी नक्की भेट देण्यासाठी जाल. या वरील मी काही लेख सादर केले आहेत.

जाण्याचे मार्ग गडावर जाण्यासाठी सध्या २ मार्ग उपलब्ध आहेत, एक “पाच्यापुर” या मार्गी जाता येते आणि दुसरा मार्ग हा “ठाणाळे” या मार्गी आहे. हे दोनी गावे सुधागड तालुक्यात येतात. तुम्ही ट्रेन ने येणार असाल तर ट्रेन खपोली पर्यंत येते आणि दुसरा नागोठणे या ठिकाणी उतरून पाली या ठिकाणी येऊन, बल्लाळेश्वर ८ गणपती मधील एक देवस्थान आहे. याला बल्लाळेश्वर पाली असे हि म्हटले जाते. पाली वरून तुम्हाला विक्रम भेटेल, ती तुम्हला पचयापुर किंवा नाडसूद या गावी सोडेल.  पाच्छापूर दरवाजा     पाली ते पाच्छापूर हे अंतर १२ किमी आहे, तर पाली ते ठाकूरवाडी हे अंतर 13 किमी आहे. पाच्छापूर ते ठाकूरवाडीपर्यंत चालत जाता येते.  या वाटेने गडावर जाण्यासाठी दोन तास लागतात. ही वाट आपल्याला थेट पाच्छापूर दरवाजापर्यंत घेऊन जाते. नणंद घाट या वाटेने पाहायला मिळते. २ बुरुज या वाटेने जाताना पाहायला मिळतात  या दरवाज्यातून टेकडीवर प्रवेश केला तर काही अंतर चढून गेल्यावर एक पठार लागते. डावीकडे ‘सिद्धेश्वर’ शंकराचं मंदिर आहे, धान्याची कोठारे, काही टाके, “हवालदार तळे” आणि “हत्तीमाल” नावाचा तलाव आहे. उजव्या हाताला किल्ल्याची नैसर्गिक तटबंदी दिसते.

भोरेश्वर मंदिर     सिद्धेश्वर’ शंकर मंदिर जवळून पुढे चालत गेल्यावर पुढे राजवाडा लागतो.  राजवाड्याजवळ ‘भोरेश्वर’ मंदिर आहे. अजून पुढे गेल्यावर गुप्त दरवाजा असलेली विहीर दिसते. राजवाड्यापासून ‘भोराईदेवी’ मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायर्‍या आहेत. जर आपण दुसऱ्या वाटेने उतरलो तर ते आपल्याला पाण्याच्या टाक्यांकडे घेऊन जाते, ज्यात पिण्याचे पाणी चांगले आहे. या टाक्यांच्या डाव्या बाजूची वाट आपल्याला एका गुप्त दरवाजाकडे घेऊन जाते. मात्र हा मार्ग सध्या अस्तित्वात नाही.

दिंडी दरवाजा(महादरवाजा) सावष्णीचा घाट (सावष्णीचा एक खिंड):

       12 किमी अंतरावर असलेल्या पाली गावातून थेट धोंडसे गावात या. या ठिकाणाहून गडावर जाण्यासाठी ३ तास लागतात आणि वाट खूपच दमछाक करणारी आहे. पण ते सरळ आहे; त्यामुळे मार्ग सोडण्याची शक्यता कमी आहे. या वाटेने आपण दिंडी दरवाजापर्यंत पोहोचतो. सावष्णीच्या घाटातून निघणारी वाट थेट दिंडी दरवाजापर्यंत घेऊन जाते. हा दरवाजा रायगडावरील महादरवाजा (मुख्य प्रवेशद्वार) ची हुबेहूब प्रतिकृती आहे. या दरवाजाचे बांधकाम आणि मांडणी “गोमुखी” (गाईच्या तोंडाच्या आकारात) नावाची आहे. हा दरवाजा दोन मोठ्या बुरुजांमध्‍ये लपलेला असल्यामुळे सुरक्षित आहे.

गडावर राजवाड्याच्या मागील बाजूस एक गुप्त विहीर आहे. त्यात एक बोगदा आहे, पण आता तो चिखलाने खचला आहे. काही अडचण आल्यास गडावरून खाली उतरण्यासाठी एक गुप्त वाटही आहे. भोराई देवी मंदिराच्या मागील बाजूस काही समाधी आहेत. त्यावर आपल्याला सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते.

 

सुधागडचा टकमक टोक

 राजवाडा सोडल्यानंतर पायऱ्यांनी वर यावे आणि वाटेच्या उजव्या बाजूला वळावे. हा मार्ग ‘हत्ती पागा’ (ज्या ठिकाणी हत्ती बांधला होता) जातो.

ते थेट आपल्याला एका शिखरावर घेऊन जाते. हे शिखर रायगडावरील “टकमक टोक” या सुळक्यासारखे आहे. या शिखरावरून धनगड, कोरीगड, तेल-बैला अगदी स्पष्ट दिसतो. त्याचप्रमाणे या ठिकाणाहून ‘अंबा’ नदी व तिच्या आजूबाजूची गावे पाहता येतात.

खूप सुंदर अशी फोटोग्राफी आपल्या येते करता येते. सकाळी ७ आणि सायंकाळी ६ च्या दरम्यान खूप सुंदर असे फोटो इथे काढता येतात.

राहण्याची सोय       1.पंत सचिव यांच्या राजवाड्यात अंदाजे 50 लोक राहू शकतात.

2. गडावरील मुक्कामासाठी भोराई देवी मंदिर देखील उत्तम ठिकाण आहे.

अन्न सुविधा:

       जेवणाची व्यवस्था स्वतःच करणे चांगले. मात्र ते शक्य नसेल तर गडावर राहणारे श्री.मोरे यांच्याशी संपर्क साधावा. तो ४ ते ५ लोकांच्या जेवणाची व्यवस्था करू शकतो.

पिण्याच्या पाण्याची सोय:

       गडावर अनेक तलाव आणि टाकी आहेत. त्यामुळे वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध असते.


Recommended Posts

ही माहिती लिहिण्यामागचा माझा हेतू अत्यंत शुद्ध असून कोणाचीही प्रस्थापित मतं खोडण्याचा, कुणालाही दुखावण्याचा माझा हेतू नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नयेत.माझे मत हे; वाचन, मनन, चिंतन, अवलोकन विविध चर्चा आणि काही अनुभव इत्यादींचा परिपाक असून, त्याला कोणताही सबळ पुरावा ह्या क्षणी माझ्याकडे मागू नये ही नम्र विनंती.


 हि माहिती आवडल्यास व्हाट्स अँप वर क्लिक करून इतरांना हि share करा. अजून काही माहिती हवी असल्यास कंमेकॅन्ट बॉक्स मध्ये सांगू शकता

 

Scroll to Top